Posts

Showing posts from 2020

रौद्र की रुद्र (कोकणकडा सफर)

Image
झोपण्याची व्यवस्था बघून झाल्यावर जेवण करून सगळी जण सुस्त झाली होती काहींनी दुपारच्या वेळेत खेळायला सुरुवात केली खेळणं आलं की धिंगाणा.... मस्ती.... ओरडणं आलचं तसचं ते इथे होत होतच मी मात्र ह्या सगळ्यात होतो पण सगळ्यापासून तटस्थ होतो कारण मी टीम लीड करत होतो ह्या भूमिकेत कितीही इच्छा असली तरी तटस्थ राहवच लागत ह्यात अनेक मतांतरे असतील प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते नव्हे तरी असायलाच हवी कारण आपण स्वतः कुठे कमी पडतोय आणि आपल्या मर्यादा काय हेही स्पष्ट होत   ...कारण ती जवाबदारी असते आणि ती योग्य पद्धतीने पार पडावी ही प्रामाणिक इच्छा! हा माझा स्वभाव माझ्या मित्रांना सुद्धा माहिती आहे, म्हणूनच ते माझ्या निर्णयाला पाठिंबा देत आलेत आणि आम्ही सगळ्यांनी आजपर्यंत चा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करत आलोय असो हे झालं माझं मत बाकीच्यांचा दृष्टीकोन कदाचित वेगळा असेल ह्या सगळ्याकडे बघण्याचा, माझं मात्र तटस्थ राहण्याचं कारण खेळण्याच्या ओघात पुढील कार्यक्रमाच नियोजन फसू नये आणि तो वेळ वाया जाऊ नये म्हणून .....खेळणं बंद झाल्यानंतर अर्थात ते बंद करणारा मीच 'हिटलर ऑफ ग्रुप' आणि त...

ट्रेकर्स 'लॉक'..... ट्रेकिंग 'डाउन'

Image
ट्रेकर्स 'लॉक'..... ट्रेकिंग 'डाउन' दिवाळी ट्रेक उत्तम पार पडला आणि नवे ट्रेक्स डोक्यात आकार घ्यायला लागले राजगड-तोरणा,अलंग मदन कुलंग..... मग कोल्हापूर जिल्हा की सोलापूर जिल्हा की सातारा हेच विषय डोक्यात चालू असताना,ह्या सगळ्यात नशिबाने आम्हा सगळयापुढे एक आव्हान उभं केलं आणि ते आव्हानं म्हणजे "कोरोना व्हायरस" ह्या एका संकटाने सगळ्यांना घरात बसवलं पण नुसतंच बसवलंच नाहीतर ज्या लोकांनी प्लॅन केले होते ते एका झटक्यात मातीमोल झाले साहजिकच आमच्या सारखे सतत भटकंती चा विचार करणारी 'भटकी जमात' सुद्धा सापडली आणि अजूनही आहे ह्याच वाईट वाटणं स्वाभाविक होत कारण गेल्या १०-१२ वर्षात ह्यात खंड पडला नव्हता किंवा गोनीदांच्या भाषेत सांगायच झाल्यास विक्रम-वेताळच्या दिनचर्येत खंड पडला नव्हता आणि अश्या परिस्थितीला सामोरं पुर्णपणे अनपेक्षित होत.... असो पण एक नागरिक, ट्रेकर ,भटकती आत्मा म्हणू हवं तर किंवा निसर्गाच्या सानिध्यात वावरणारी माणसं.....ह्या लॉकडाउन मध्ये फिरण्यावर बंधन आली आहेत किल्ले,ऐतिहासिक स्थळे बंद आहेत आणि नुसत्या गुगल अर्थ वर ठिकाणं बघणं ही स्वभा...

सांधण व्हॅली 2.0

Image
 हो नाही ,हो नाही म्हणता  सांधण व्हॅली चा ट्रेक ठरला, शंकाकुशंकानी प्रभावित झालेला हा ट्रेक खऱ्या अर्थाने होतो की नाही ? ह्या टप्यावर येऊन पोहोचला होता...त्याला कारणही तशीच अगदी! पावसामुळे रद्द होणारी लोकं त्यातुन निर्माण झालेलं गोंधळाचे वातावरण, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत किती लोक येणार ह्याच मुद्यावर अडकलेली 'गाडी'अखेर 11च्या सुमारास 19 लोकांच्या साथीने 'साम्रद' गावाच्या दिशेने धावायला लागली,मग नारायणगाव येथील  चहा,दूध असा ठरलेला शिरस्ता ....पण वाटेत पहाटे 5 पर्यंत पडत असलेला पाऊस,पावसाच्या पडणाऱ्या थेंबांबरोबर मनात सुद्धा भीतीचा चालणारा पाठशिवणीचा खेळ.... हे सगळंच परिस्थितीच्या विरुद्ध होतं... पण 'इरादे हे फौलादी ,हिम्मते हर कदम' ह्या अविर्भावात असलेली आम्ही मंडळी ह्या टप्यावर सुद्धा न खचता जायचंच ! ह्याच निकराने निघालो होतो, आणि 6 च्या सुमारास..  कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात  प्रवेश करताच सुुर्यानारायणाने आपल्या किरणांच्या रूपाने आम्हाला आमंत्रणच दिलेे मग मात्र आत्मविश्वासाने जी काही 'हनुमान उडी मारली' की हा ट्रेक आपला पुर्ण होणार ह्याची ...